
हरिराम मीणा आदिवासींच्या जमिनी बळकावल्या जात असल्याच्या विचाराने अगदीच अस्वस्थ होवून आपल्या कवितेत मांडतात,
कैसे करोगे साबित
सभ्यता कि इस अदालत मे
कि ये भौम(जमीन) तुम्हारी थी !
आदिवासी समाज बांधवांची जमीन म्हणजे त्यांची नस आहे…त्याशिवाय ते आपले अस्तित्त्व टिकवूच शकत नाही. असे असताना सरकार, जमीनदार, शहरातील व्यावसायिक आदिवासींना जबरदस्तीने जमिनींवरून हाकलून लावत आहेत. काही आदिवासी व्यसनांच्या आहारी गेल्याने जमिनी विकत आहेत. आपली जगण्याची नस तुटली जात आहे या विचाराने कवी आपल्या कवितेत पुढील प्रश्न विचारतात-
‘देखो तुम देख रहे हो
कि वे आ रहे है
तुम्हारी नसे तन रही है
तुम्हारी भुजाए फडक रही है
तुम्हारे तीर कमान तने है
तुम एकजूट हो
मगर तुम कुछ नही कर रहे
तुम आक्रमण कर सकते हो
मगर तुम डर रहे हो
आखिर क्यो-क्यो?’
कवीच्या या व्यथित मनातील भावना समजून घेवून त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाचे उत्तर सापडून आपणास थांबून चालणार नाही. तर त्यासाठी आपणास प्रत्यक्ष कृती करण्याची गरज आहे. आपल्या जमिनीचे मोल आणि तिचे अस्तित्व यावरच आदिवासी समाजाचे अस्तित्व अवलंबून आहे. कारण मोठ्या प्रमाणात शहरातील धनदांडगी मंडळी आदिवासींच्या जमिनी आज बळकावत असल्याचे आपण नित्य बघत आहोत. त्यासाठी आपणास सर्वांगीण जनजागृती करण्याची गरज आहे.
©Aboriginal Voices
0 comments :
Post a Comment