Keleshwar Temple, Kelirumhanwadi, Tal Akole, Dist Ahmednagar
देवगिरीच्या यादवांच्या राज्याचे सन १२५९ ते १२७४ याकाळात महाराष्ट्रात बांधलेली हेमाडपंथी मंदिरे नजर खिळवून ठेवतात . या शैलीने यानंतरही जादू कायम ठेवल्याने यादवांच्या राज्यानंतरही स्थानिक संस्थांनिकांनी बांधलेली मंदिरे याच शैलीत बांधलेली आहेत . यातील काहीच मंदिरांचे वैभव अजूनही टिकून आहे . ही मंदिरे व हेमाडपंथी स्थापत्यशैली अकोले तालुक्याच्या वैभवाला लाभलेले कौंदणच आहे .
भारतीय स्थापत्यशैलींपैकी एक प्रमुख शैली म्हणून हेमाडपंथी शैलीचा उल्लेख केला जातो .
देवगिरीच्या यादवांच्या राज्याचे सन १२५९ ते १२७४ याकाळात मुख्य प्रधान राहिलेल्या हेमाद्री पंडित किंवा हेमाडपंत यांनी या प्रकारच्या इमारत बांधणीचा महाराष्ट्र आणि दख्खन पठारावर अनेक ठिकाणी उपयोग केल्याने ही बांधणीपद्धत त्यांच्या नावावरून हेमाडपंती म्हणून ओळखली जाते . सामान्यतः इमारत बांधणीत घडवलेल्या दगडांमध्ये चुना किंवा त्याप्रकारचा दर्जा न भरता दगडच वेगवेगळ्या कोनातून कापून , त्यांनाच खुंट्या आणि खाचा पाडून ते एकमेकांत घट्ट बसू शकतील अशी रचना केली जाते . मंदिरांसारख्या वास्तूत पायापासून शिखरापर्यंत ही दगड एकमेकांत गुंफून केलेली रचना एकसंध उभी राहाते आणि टिकाऊही बनते हेही हेमाडपंती स्थापत्यशैलीचे वैशिष्ट आहे .
कोकणचा शेजार लाभलेल्या, सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या अकोले (जि. अहमदनगर) तालुक्याला जसे अभिजात निसर्गसौंदर्याचे वरदान मिळाले आहे; त्याबरोबरच वैभवशाली इतिहास आणि समृद्ध वास्तुरचनेचाही वारसा लाभला आहे. हरिश्चंद्रगड, रतनगड, विश्रामगड यांसारखे लहान-मोठे दीड डझन गडकिल्ले आणि हरिश्चंद्रेश्वर (हरिश्चंद्रगड), सिद्धेश्वर (अकोले), अमृतेश्वर (रतनवाडी) यांसारखी अप्रतिम शिल्पसौंदर्याने नटलेली प्राचीन मंदिरे याचीच साक्ष देतात. हेमाडपंथी मंदिराच्या बांधणीची विविध वैशिष्टय़े केळी रुम्हणवाडी येथील केळेश्वर मंदिराच्या बांधकामातही आढळतात. बांधकामासाठी चुन्याचा वापर करण्यात आलेला नाही. कापलेले व कोरीवकाम केलेले दगड विशिष्ट पद्धतीने एकात एक बसवून संपूर्ण मंदिराची उभारणी करण्यात आलेली आहे.
सह्याद्री पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर (उंची १ हजार ६४६ मीटर) असणा-या शिखर स्वामिनी कळसूबाईपासून काही अंतरावर आहे पट्टाकिल्ला ऊर्फ विश्रामगड. छत्रपती शिवाजी महाराजांचा पदस्पर्श झालेला हा अकोले तालुक्यातील एकमेव किल्ला. या विश्रामगडाच्या परिसरातच आढळा नदी उगम पावते. येथून काही अंतरावर आहे केळी रुम्हणवाडी हे खेडेगाव. या खेडय़ातच आढळा नदीच्या काठावर अप्रतिम शिल्पसौंदर्याचा आविष्कार असणारे पुरातन देखणे केळेश्वराचे मंदिर आहे. या मंदिराला प्राचीन धार्मिक महत्त्वसुद्धा आहे. केळेश्वर हे नाव कोडेश्वर या नावावरून आलेले असावे असे म्हटले जाते. कारण या मंदिराच्या शेजारीच एक प्रसन्न असे तीर्थ आहे. या तीर्थाला पूर्वी बाराही महिने पाणी असायचे. या पाण्यात अंघोळ केल्याने विविध त्वचारोग बरे होतात असा विचार प्रचलित आहे. त्यामुळे अनेक अंगावर कोडे झालेल्या व्यक्ती या तीर्थामध्ये स्नान करण्यासाठी येतात. तसेच केळेश्वर या नावावरून ‘केळी’ व नदीचा आकार नांगराच्या रुम्हण्यासारखा असल्याने ‘रुम्हणवाडी’ असे ‘केळी रुम्हणवाडी’ हे नाव गावाला पडले असावे.
अकोले येथून केळी रुम्हनवाडी ३५ किमी अंतरावर आहे. मुंबई, नाशिकवरून इगतपुरी-घोटी मार्गाने टाकेदजवळचा म्हैसवळण घाट चढूनही केळी रुम्हनवाडीला पोहोचता येते. हेमाडपंथी स्थापत्य शैलीतील टाहाकारीचे मंदिरही येथून फक्त ३ किमी अंतरावर आहे. मंदिर बाराव्या अथवा तेराव्या शतकात बांधले गेले असावे. काळाच्या ओघात मंदिराच्या बाह्य़स्वरूपात काही बदल झाले. मंदिरावरची मूळची ४ शिखरे पडून गेली. मूळच्या शिखरांच्या जागी नव्याने बांधलेल्या कळसांना व मंदिराला रंगरंगोटी करण्यात आली आहे. त्यामुळे या मंदिराचे प्राचीन वैभव काही प्रमाणात लुप्त झाल्याचा आपणास भास होतो. तथापि शिखरापर्यंतचा मंदिराचा मुख्य दगडातील भाग आजही मंदिराच्या वैभवाची साक्ष देत उभा आहे.
हे मंदिर पूर्वाभिमुख आहे. समोरूनच आढळा नदी वाहते. नदीपासून सुमारे ३०-४० फूट उंचीवर मंदिर उभे असून नदी पात्रालगत बांधलेला घाट, समोरच पावसाळ्यात फेसाळणारा नयनरम्य धबधबा, झाडे आणि सभोवताली असलेल्या डोंगररांगा यामुळे हा परिसर रमणीय बनला आहे.
-राजू ठोकळ
शिवस्पंदन युवा
माझी संस्कृती….सह्यभ्रमंती !!!
देवगिरीच्या यादवांच्या राज्याचे सन १२५९ ते १२७४ याकाळात महाराष्ट्रात बांधलेली हेमाडपंथी मंदिरे नजर खिळवून ठेवतात . या शैलीने यानंतरही जादू कायम ठेवल्याने यादवांच्या राज्यानंतरही स्थानिक संस्थांनिकांनी बांधलेली मंदिरे याच शैलीत बांधलेली आहेत . यातील काहीच मंदिरांचे वैभव अजूनही टिकून आहे . ही मंदिरे व हेमाडपंथी स्थापत्यशैली अकोले तालुक्याच्या वैभवाला लाभलेले कौंदणच आहे .
भारतीय स्थापत्यशैलींपैकी एक प्रमुख शैली म्हणून हेमाडपंथी शैलीचा उल्लेख केला जातो .
देवगिरीच्या यादवांच्या राज्याचे सन १२५९ ते १२७४ याकाळात मुख्य प्रधान राहिलेल्या हेमाद्री पंडित किंवा हेमाडपंत यांनी या प्रकारच्या इमारत बांधणीचा महाराष्ट्र आणि दख्खन पठारावर अनेक ठिकाणी उपयोग केल्याने ही बांधणीपद्धत त्यांच्या नावावरून हेमाडपंती म्हणून ओळखली जाते . सामान्यतः इमारत बांधणीत घडवलेल्या दगडांमध्ये चुना किंवा त्याप्रकारचा दर्जा न भरता दगडच वेगवेगळ्या कोनातून कापून , त्यांनाच खुंट्या आणि खाचा पाडून ते एकमेकांत घट्ट बसू शकतील अशी रचना केली जाते . मंदिरांसारख्या वास्तूत पायापासून शिखरापर्यंत ही दगड एकमेकांत गुंफून केलेली रचना एकसंध उभी राहाते आणि टिकाऊही बनते हेही हेमाडपंती स्थापत्यशैलीचे वैशिष्ट आहे .
कोकणचा शेजार लाभलेल्या, सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या अकोले (जि. अहमदनगर) तालुक्याला जसे अभिजात निसर्गसौंदर्याचे वरदान मिळाले आहे; त्याबरोबरच वैभवशाली इतिहास आणि समृद्ध वास्तुरचनेचाही वारसा लाभला आहे. हरिश्चंद्रगड, रतनगड, विश्रामगड यांसारखे लहान-मोठे दीड डझन गडकिल्ले आणि हरिश्चंद्रेश्वर (हरिश्चंद्रगड), सिद्धेश्वर (अकोले), अमृतेश्वर (रतनवाडी) यांसारखी अप्रतिम शिल्पसौंदर्याने नटलेली प्राचीन मंदिरे याचीच साक्ष देतात. हेमाडपंथी मंदिराच्या बांधणीची विविध वैशिष्टय़े केळी रुम्हणवाडी येथील केळेश्वर मंदिराच्या बांधकामातही आढळतात. बांधकामासाठी चुन्याचा वापर करण्यात आलेला नाही. कापलेले व कोरीवकाम केलेले दगड विशिष्ट पद्धतीने एकात एक बसवून संपूर्ण मंदिराची उभारणी करण्यात आलेली आहे.
सह्याद्री पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर (उंची १ हजार ६४६ मीटर) असणा-या शिखर स्वामिनी कळसूबाईपासून काही अंतरावर आहे पट्टाकिल्ला ऊर्फ विश्रामगड. छत्रपती शिवाजी महाराजांचा पदस्पर्श झालेला हा अकोले तालुक्यातील एकमेव किल्ला. या विश्रामगडाच्या परिसरातच आढळा नदी उगम पावते. येथून काही अंतरावर आहे केळी रुम्हणवाडी हे खेडेगाव. या खेडय़ातच आढळा नदीच्या काठावर अप्रतिम शिल्पसौंदर्याचा आविष्कार असणारे पुरातन देखणे केळेश्वराचे मंदिर आहे. या मंदिराला प्राचीन धार्मिक महत्त्वसुद्धा आहे. केळेश्वर हे नाव कोडेश्वर या नावावरून आलेले असावे असे म्हटले जाते. कारण या मंदिराच्या शेजारीच एक प्रसन्न असे तीर्थ आहे. या तीर्थाला पूर्वी बाराही महिने पाणी असायचे. या पाण्यात अंघोळ केल्याने विविध त्वचारोग बरे होतात असा विचार प्रचलित आहे. त्यामुळे अनेक अंगावर कोडे झालेल्या व्यक्ती या तीर्थामध्ये स्नान करण्यासाठी येतात. तसेच केळेश्वर या नावावरून ‘केळी’ व नदीचा आकार नांगराच्या रुम्हण्यासारखा असल्याने ‘रुम्हणवाडी’ असे ‘केळी रुम्हणवाडी’ हे नाव गावाला पडले असावे.
अकोले येथून केळी रुम्हनवाडी ३५ किमी अंतरावर आहे. मुंबई, नाशिकवरून इगतपुरी-घोटी मार्गाने टाकेदजवळचा म्हैसवळण घाट चढूनही केळी रुम्हनवाडीला पोहोचता येते. हेमाडपंथी स्थापत्य शैलीतील टाहाकारीचे मंदिरही येथून फक्त ३ किमी अंतरावर आहे. मंदिर बाराव्या अथवा तेराव्या शतकात बांधले गेले असावे. काळाच्या ओघात मंदिराच्या बाह्य़स्वरूपात काही बदल झाले. मंदिरावरची मूळची ४ शिखरे पडून गेली. मूळच्या शिखरांच्या जागी नव्याने बांधलेल्या कळसांना व मंदिराला रंगरंगोटी करण्यात आली आहे. त्यामुळे या मंदिराचे प्राचीन वैभव काही प्रमाणात लुप्त झाल्याचा आपणास भास होतो. तथापि शिखरापर्यंतचा मंदिराचा मुख्य दगडातील भाग आजही मंदिराच्या वैभवाची साक्ष देत उभा आहे.
हे मंदिर पूर्वाभिमुख आहे. समोरूनच आढळा नदी वाहते. नदीपासून सुमारे ३०-४० फूट उंचीवर मंदिर उभे असून नदी पात्रालगत बांधलेला घाट, समोरच पावसाळ्यात फेसाळणारा नयनरम्य धबधबा, झाडे आणि सभोवताली असलेल्या डोंगररांगा यामुळे हा परिसर रमणीय बनला आहे.
-राजू ठोकळ
शिवस्पंदन युवा
माझी संस्कृती….सह्यभ्रमंती !!!