_जंगली करवंदाची शेती_
_लाखोचं उत्पन्न_
_जंगलीझाड माणसात आणताना_
_लाखोचं उत्पन्न_
_जंगलीझाड माणसात आणताना_
७५ वर्षाचा हा तरुण या रानमेव्यापासून वर्षाकाठी १० लाखांपर्यंत उत्पन्न मिळतोय.
सर्वाधिक शेतकरी आत्महत्या होणारा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या यवतमाळमध्ये, एका शेतकऱ्याने जंगली झाडाची पीक म्हणून शेतकऱ्यांना ओळख करुन दिली आहे. या जंगली झाड-पीकातून त्याने लाखो रुपयाचं उत्पन्न मिळवलं आहे. यवतमाळच्या पुसद तालुक्यातील जनार्धन जाधव यांनी २० वर्षापूर्वी या रानमेव्याचं महत्त्व ओळखलं. जंगली समजल्या जाणाऱ्या दुर्लक्षित झाडाला त्यांनी आधी बांधावर आणि नंतर थेट शेतीत आणलं.
ही फळ तुमच्या ओळखीचीच आहेत.गावाकडं जिला डोंगरची काळी मैना म्हणून ओळखलं जात तीच ही करवंदं. इथल्या वरुड गावात ६ एकरावर परसलेली गुलाबी करवंदाची बाग त्यांनी मोठ्या कष्टानं जपली आहे. इथं हिरवी आणि गुलाबी जातीची ४ हजार झाडं आहेत. मे-जून महिन्यात या झाडांना फुलं लागतात, तर पहिल्या पावसानंतर फळधारणा होते.
हे झाड जंगली असलं तरी जनार्दनराव त्यांची विशेष काळजी घेतात. झाडांच्या गरजेनुसार त्यांना सेंद्रीय खतं देतात. त्यामुळं या करवंदाचा आकार मोठा आणि एकसारखा पाहायला मिळतो. विशेष म्हणजे जंगली पीक असल्यानं याच्यावर कोणताही किड-रोग येत नाही.
*_करवंदांचा उपयोग मुरब्बा, जाम-जेली आणि लोणचं बनवण्यासाठी केला जातो. व्यापारी या करवंदांची थेट शेतावर येऊन खरेदी करतात._*
*_करवंदाची औषधी गुणधर्म पाहता या रानमेव्याला शहरात मागणी वाढत आहे. करवंदापासून कार्बोहायड्रेट, प्रथिनं आणि क जीवनसत्व मुबलक प्रमाणात मिळतं._*
(टीप - भविष्यात अश्या विविध रान मेव्याच्या माध्यमातून आपला आदिवासी युवा वर्ग अभ्यास पुर्वक शेती करुन भरघोस उत्पन्न घेउ शकेल.)
0 comments :
Post a Comment